नळदुर्ग -: येथील बसस्‍थानकात शहर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्‍यावतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 122 वी जयंती वाहतुक निरीक्षक अरुण गायकवाड यांच्‍या हस्‍ते प्रतिमा पूजन करुन साजरी करण्‍यात आली.
    यावेळी भाजपाचे सुशांत भूमकर बोलताना म्‍हणाले की, आज भारतीय राजकारणात बाबासाहेबांच्‍या ख-या विचारांचा एकही राजकीय नेता उरलेला नसल्‍याची खंत व्‍यक्‍त करुन बाबासाहेबांनी उर्जाव जल योजनेचा नेहरुंच्‍या पहिल्‍या सरकारला दिलेला प्रस्‍ताव जर शासनाने राबवला असता तर आज देशावर वा राज्‍यावर ओढावलेले जल, वीज संकट हे असलेच नसते. याला सर्वस्‍वी राज्‍यकर्त्‍यांचा नाकर्तेपणाच जबाबदार असल्‍याची आरोप यावेळी त्‍यांनी केला.
    यावेळी जयंत गायकवाड, जीवन बनसोडे, पत्रकार अरुण लोखंडे, अशोक अलकुंटे, रवि सुरवसे, पप्‍पू पाटील, गणेश अरगडे, रवी गवळी, दादा शिंदे, महावीर खारवे, संजय बेडक यांच्‍यासह आंबेडकरप्रेमी नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी मानले.
 
Top