उस्मानाबाद : शहरातील उंबरेकाठा व देशपांडे स्टॅन्ड येथे महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
    हरी सोनटक्‍के, संतोष चौरे, नारायण सोनटक्‍के (सर्व रा. बेंबळी, ता. उस्‍मानाबाद), पद्माकर शिंदे (रा. आरणी, ता. उस्‍मानाबाद) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. दि. 25 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्‍याच्‍या सुमारास बेंबळी येथील महिला शहरातील देशपांडे स्‍टँड येथे बाजार करण्‍यात आली होती. यावेळी हरी सोनटक्‍के, संतोष चैरे व नारायण चौरे या तिघांनी त्‍या महिलेस 'तू आमच्‍याविरूद्ध बेंबळी पोलिसात तक्रार का दाखल केली' असे म्‍हणत त्‍यास अर्वाच्‍च शिवीगाळ करुन विनयभंग केल्‍याची तक्रार महिलेने दिल्‍यावरुन वरील तिघांविरूद्ध उस्‍मानाबाद शहर पोलीसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.
    दि. 24 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास उंबरेकोठा येथे एक महिला तिच्या घरात झोपली असता, पद्माकर शिंदे  याने तिच्या घराची कडी वाजवली. यावेळी सदरील महिलेने दरवाजा उघडल्यानंतर शिंदे याने तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. यावेळी महिलेने आरडाओरड केल्यानंतर शिंदे याने धूम ठोकली.
 
Top