उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरासाठी उजणी पाणीपुरवठा योजनेच्या कामास संबंधित यंत्रणेनी गती देवून जनतेला पिण्याचे पाणी पुरवठा करण्याच्या कामास प्राधान्य दयावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण यांनी  केले.उस्मानाबाद  तालुक्यातील हातलादेवी पायथ्याशी  उस्मानाबाद शहर उजनी  पाणीपुरवठा योजनेस भेट दिली  व  संबधित यंत्रणेकडून माहिती  घेताना  श्री. चव्हाण बोलत होते.
    याप्रसंगी खासदार डॉ. पदमसिंह पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, विश्वास शिंदे, मधुकर तावडे, ब्रिजलाल मोदाणी, जिल्हाधिकारी डॉ. के.एम.नागरगोजे, लोकप्रतिनिधी  आदि उपस्थित होते.                                    
         यावेळी पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता आर. एन. तांगडे, पी. एम. सीचे एस. एच. कल्याणी, नगर अभियंता एस. आर. जाधव, न. पा. चे मुख्याधिकारी जाधवर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उपस्थित होते.
 
Top