उस्मानाबाद-  प्रत्येक वर्षी शासकीय वसतिगृहांमध्ये रिक्त होणाऱ्या जागांमधील 15 टक्के जागा व खास बाब प्रवेशाने भरण्यात येतात. सन 2014-15 मध्ये  या प्रवेशाच्या जागा गुणवत्तेनुसार व खालील टक्केवारीनुसार ऑनलाईन अर्जाद्वारेच भरण्यात येणार असल्याची   सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग,उस्मानाबाद यांनी दिली आहे.
    बिगर व्यावसाईक महाविद्यालये-5 टक्के व्यावसाईक महाविद्यालये-5 टक्के यांच्यासाठी दोन्ही फक्त बी.पी.एल.धारक विद्यार्थ्यांमधून,अपंग- 3 टक्के आणि अनाथ -2 टक्के अशी टक्केवारी आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी  https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 6 ते 21 सप्टेंबर,2014 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहेत. त्यांनी पुन्हा ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 
Top