उस्मानाबाद : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगती अन् उन्नतीसाठी काँग्रेस पक्षाने विविध जनकल्याणकारी योजना राबवित सर्वांगीण विकास केला आहे. पुढील काळातही मतदार संघाच्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे व हाताला साथ द्यावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा काँग्रेसचे उमेदवार मधूकरराव चव्हाण यांनी केले आहे. 
उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी जि.प. चे उपाध्यक्ष सुधाकर गुंड, अशोकराव जवळगे, दत्तात्रय सोनटक्के, राजेंद्र शेरखाने, लक्ष्मण सरडे, कल्पनाताई मगर आदींची उपस्थिती होती. 
यावेळी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, आपण कधीही जातीपातीचे राजकारण केले नसुन मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्यामध्ये तुळजापूरातील प्राधिकरणासाठी तिनशे कोटीचा विकासनिधी खेचून आणला. शिवाय मतदारसंघातील ७२ गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देवून विकास कामे केली आहेत. तेर येथील संत गोरोबा काकाच्या मंदिरासाठी दोन कोटीचा निधी दिला. शिवाय मंदिर, मशिदीसह सर्व धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी न मागता मोठ्या प्रमाणात निधी देवून विकास कामे केली आहेत. 
यावेळी बामणी, पाटोदा, वडाळा, उमरेगव्हाण, केशेगाव, अनसुर्डा, गौडगाव, आंबेवाडी आणि गावात पदयात्रा काढून मतदरांशी संवाद साधला आहे.  
 
Top