कळंब : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर खंडणी गोळा करणारे पक्ष हे शिव सेना , भा ज़. प असून महाराष्ट्रातील जनतेला हे पक्ष वेड्यात काढण्याचे काम करत आहेत. आशा पक्षांना महाराष्ट्राची सत्ता आपण देणार का असा सवाल कळंब- उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी कळंब येथे मतदारांना विचारला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेनेचे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली.
   या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारला कि खरा अफजलखान नरेंद्र मोदी कि अमित शहा याचे उत्तर त्यांनी द्यावे, केंद्रामध्ये हे दोन्ही पक्ष एकाच ताटामध्ये जेवत असून महाराष्ट्रात मात्र ते एकमेकावर टीकेची झोड उडवीत आहेत व महाराष्ट्रातील जनतेला    वेड्यात  काढण्याचे काम करत आहेत. नरेंद्र मोदी यांना नितीन गडकरी यांच्या सारखे दर्जा खालावलेले मंत्री मंत्री मंडळामध्ये कसे काय चालतात? असे त्या म्हणाल्या, तसेच शरद पवार यांनी नेहमीच शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले होते मात्र भाजपच्या शासन काळात शेतक-याचे नुकसान होणारे निर्णय घेतले जात आहेत. स्थानिक आमदारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या कि जो आमदार विधानसभेत खोटे बोलतो त्या आमदाराला तुम्ही पुन्हा निवडून देऊ नका. मी या ठिकाणी एका बहिणीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आलेली आहे. या ठिकाणी खर्या अर्थाने भाकरी फिरवण्याची गरज असून आपण अतिशय अभ्यासू कार्यक्षम असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले. या वेळी राणा जगजितसिंह पाटील यांनी शिवसेना भाजप वर टीका केली, ते म्हणाले कि जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्या मध्ये मिलीभगत असून तेरणा कारखान्याची व जिल्हा मध्यवर्ती बँकेची वाट लावण्यात हेच जिम्मेदार आहेत. आपण मला निवडून दिल्यास मी या भागाचा मोठा विकास करेन असे आश्वासन हि त्यांनी यावेळी दिले. या सभेस माजी खा डो पद्मसिंह पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार संजय मुंदडा नानासाहेब जाधवर , रामहरी शिंदे , भागचंद बागरेचा आदी उपस्थित होते
 
Top