येडशी :- काँग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेवुन जाणारा पक्ष असुन सर्वाना न्याय देण्याच काम हा पक्ष करत असतो, असे प्रतिपादन मधुकर चव्हाण यांनी केले. येडशी येथे आयोजित उस्मानाबाद मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विश्वास (आप्पा) शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. 
     चव्हाण पुढे म्हणाले कि सरकार बरखास्त करण्याच पाप राष्ट्रवादि ने केले. तेरणा कारखान्याची वाट ही एकाच घरातील लोकांनी लावली. तसेच जिल्हा बँक देशोधडीला लावण्याच काम या लोकांनी केले.परंतु काँग्रेस पक्षाने नेहमी विकासाच राजकारण केले. शेतक-यांसाठी विविध योजना राबविल्या.गारपीठ ग्रस्ताना मदत केली .येवढेच नाहीं तर मराठा,मुस्लिम आरक्षण देण्याच काम केल.त्यामुळे विकासासाठी काँग्रेसला निवडुन द्या.असे आव्हान त्यांनी उपस्थित ग्रामस्थाना केले.  यावेळी व्यासपिठावर माजी पालकमंत्री मधुकर चव्हाण, काँग्रेस चे उमेदवार विश्वास शिंदे,भागवतराव धस,नारायण समुद्रे,प्रदिप सस्ते, दौलतराव माने, राजाभाऊ शेरखाने,नितिन बागल,शशांक सस्ते, अनंत लंगड़े, धनंजय राऊत, बाबूराव तवले, अभिजीत देटे आदि उपस्थित होते.येडशी येथील बाजार मैदान चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेसाठी गावातील गावकरी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top