उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत जिल्‍हयातील  स्वयंसहायता महिला गटानी तयार केलेल्या मालाचे प्रदर्शन व ‍विक्री येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात आद्या दिपावली महोत्सव 16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत   आयोजित करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचा-यांना या प्रदर्शनास भेट देवून बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाचे /वस्तुची मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे  प्रकल्प संचालक, उस्मानाबाद यांनी केले आहे.                              
        स्वयंसहायता गटांनी विविध प्रकारची उत्पादने तयार करुन राष्ट्रीय व राज्य पातळीवर चांगली कामगिरी केल्याने त्यांना स्थास्निक बाजारपेठ उपलब्ध करुन देवून त्यांच्या वस्तुंची  विक्री  व्हावी व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी प्रदर्शन आयोजनामागिल उद्देश आहे. दिवाळी सणासाठी लागणाऱ्या पणती, आकाश कंदिल, फराळाचे पदार्थ, रांगोळी असे    विविध उत्पादने उपलब्ध राहणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे.                                                    
 
Top