पांगरी  -  ग्रामस्वछतेचा संदेश शहरी भागाबरोबरच ग्रामीण  भाग,वाड्या वस्त्यावरही पोहचू लागला आहे.घोळवेवाडी ता.बार्शी येथेही ग्रामस्वचतेच्या संदेशाची अंमलबजावणी ग्रंपंचायतीच्या वतीने करण्यात आली.
  घोळवेवाडीचे ग्रामदैवत श्री.दत्त मंदिरात ग्रामसेवक श्री.एस.पी.बागूल यांच्
या हस्ते श्रीफळ वाढवून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.घोळवेवाडीतील दत्त मंदिर परिसर, हनुमान मंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, यासह गावातील सर्व प्रमुख रस्ते झाडून व काच-याची विल्हेवाट लावून स्वच्छ करण्यात आले.या स्वच्छता अभियानात घोळवेवाडीचे सरपंच माणिक तोगे,उपसरपंच बळीराम डोळे,माजी सरपंच हनुमंत घोळवे,ग्रामपंचायत सदस्य किरण खाडे,इंदुबाई घोळवे,अविदा घोळवे,सुनंदा घोळवे आदींनी सहभाग घेतला.
 
Top