बार्शी - शैक्षणिक आणि शासकिय सेवेत ५ टक्के मुस्लिम आरक्षण, सच्चर समितीची १५ कलमी योजना सुरु करावी, दाभोळकर-पानसरे यांच्या मारेकर्यांना अटक करावी, न्या.रंगनाथ मिश्रा आणि के
.रहेमान समिती आयो लागू करावा या मागण्यांसाठी बार्शीतील मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढला.
शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मोर्चात मोठया संख्येने सहभागी नागरिकांनी हताला तसेच खिशाला शासनाच्या निषेधासाठी काळया पट्टया बांधल्या होत्या. भगवंत मैदान येथून मोर्चाची सुरूवात करण्यात आली. तहसिल कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर निवेदन देवून मोर्चाची सांगता करण्यात आली.