बार्शी -  तालुक्यातील रऊळगाव येथील भालचंद्र प्रभु भोसले (वय ४२) या शेतकर्‍याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या पूर्वी सदरची घटना घडल्याची माहिती वैराग पोलिसांनी दिली. पाच एकर कोरडवाहू शेती असलेल्या भोसले यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, ३ मुले,भाऊ असा परिवार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, बचतगट इत्यादी कर्ज त्याने काढले होते. कर्जबाजारीपणा, नापीकच्या कारणामुळे हताश झाल्याच्या कारणानेच त्याने आत्महत्या केल्याचे मृताच्या नातेवाईकाने सांगीतले. वैराग पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार एस.एन.गोडसे हे करीत आहेत.
 
Top