उस्मानाबाद - मौजे सारोळा बु ता. उस्मानाबाद येथे शासनाच्या जलयुक्त अभियानातंर्गत सिमेंट बांधातील गाळ काढणे, व रूंदीकरण कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सोमवार रोजी करण्यात आला.
उस्मानाबाद तालुक्यात 35 गावे सदरील अभियानातंर्गत निवडण्यात आली असून येत्या पाच वर्षात ही गावे टंचाईमुक्त होणार असल्याने या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोक सहभाग घेवून पाणलोट विकासाची कामे करण्याचे अवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी केले. याप्रसंगी कृषि जिल्हाअधिक्षक शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी यु.बी. बिराजदार, तालुका कृषि अधिकारी डी.आर. जाधव, तहसिलदार सुभाष काकडे, मंडळ कृषी अधिकारी ए.पी. चिक्षे, जी.टी, सस्ते, व्हि.आर. गायकवाड, आनंद जाधव, आनंद आवारे, अमोल रणदिवे, उपसरपंच कैलास पाटील