उस्मानाबाद  –  जिल्हास्तरावरील वसंतराव नाईक तांडा/वस्तीसुधार योजना समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असून नवीन अशासकीय अध्यक्ष व सदस्य नियुक्तीसाठी सात दिवसांच्या आत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    जिल्हास्तरीय समितीवरील अशासकीय अध्यक्ष व सदस्य याच्या नेमणुका दिनांक शासन निर्णय दि. 21 फेब्रुवारी, 2015 अन्वये रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन नियुक्ती करावयाच्या असल्याचे विहित प्रस्ताव सात दिवसांच्या आत सादर करावेत. सदर प्रस्ताव एकत्रित करुन ते प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, लातूर यांच्यामार्फत संचालक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय यांना सादर करता येईल, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 
Top