उस्मानाबाद - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबादच्यावतीने येत्या 11 एप्रिल 2015 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये दिवाणी स्वरुपाचे भू-संपादन, मोटार अपघात प्रकरणे तडजोडपात्र फौजदारी प्रकरण अशा सर्व प्रकारचे न्यायालयात प्रलंबीत असलेली प्रकरणे दुरसंचार, स्थानिक बंकाचे कर्ज वसूली प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
सर्व संबधित पक्षकांरानी त्यांची न्यायालयात प्रलंबीत असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तडजोडीने मिटवून घेवून पैशाचा आणि वेळेचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हा  सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. बी. मोरे यांनी केले आहे.

 
Top