उस्मानाबाद - जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटक प्रत्येक  तहसील कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5-45 या वेळेत उपस्थित राहून माजी सैनिक/विधवा/ युध्द विधवा, व अलंबितांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी दौ-याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
     यानुसार परंडा येथे 1 एप्रिल,2015 रोजी, कळंब येथे  9 रोजी, उस्मानाबाद येथे 10 रोजी, वाशी  येथे 16  रोजी, उमरगा येथे 17 रोजी, भूम येथे 23 रोजी आणि लोहारा येथे 24‍एप्रिलला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सर्व संबंधितांनी याची नोंद घेवून आपल्या अडी अडचणी सोडवून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (मेजर निवृत्त) सुभाष सासणे यांनी केले आहे.           

 
Top