पांगरी (गणेश गोडसे) :- गटारीच्या व पावसाच्या पाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात काठीने हाणामारी होऊन चारजण जखमी झाल्याची घटना घोळवेवाडी (ता.बार्शी) येथे घडली.
लचंद लक्ष्मण घोळवे सौ.मीराबाई वालचंद घोळवे, सुभाष माचिन्द्र धस,व पुष्पा शुभास धस अशी दोन्ही गटातील जखमींची नावे असून काठीने मारहाण करून ज
खमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन्ही गटातील आठजनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  वालचंद घोळवे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गाटारीच्या पाण्याच्या कारणारून त्यांची भांडणे झाली होती.त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी सुभाष माचिन्द्र धस,पुष्पा माचिन्द्र धस,रामकिसान शुभास धस,व मोहन दास घोळवे यांनी फिर्यादीसह त्यांच्या पत्नीस काठीने मारहाण करून जखमी केले.तसेच शिवीगाळ दमदाटी करत फिर्यादीस व त्याच्या मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
  सुभाष माचिन्द्र धस यांनी दिलेल्या विरोधी फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी वालचंद लक्ष्मण घोळवे,सौ.बाई लक्ष्मण घोळवे,वैषनवी लक्ष्मण घोळवे,वैभव लक्ष्मण घोळवे यांनी फिर्यादीच्या घरासमोर पावसाचे पाणी साचल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पत्नीस डोक्यात काठीने मारून जखमी केले.तसेच शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील आठ जनावर गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास महिला हवालदार सौ.देशमुख करत आहेत.
 
Top