नळदुर्ग - मुंबई येथे दि. 5 एप्रिल रोजी होत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्यव्यापी अधिवेशनास तुळजापूर तालुक्यातील रिपाइं कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात आले आहे.
दलित, अदिवासी, अल्पसंख्यांक आदी बहुजनांच्या एकजुटीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी इंडिया या पक्षाचे राज्यव्यापी अधिवेश दि. 5 एप्रिल रोजी मुंबई येथील एम.एम.आर.डी.ए. मैदान बांद्राकुर्ला कॉप्मलेक्स येथे होत असून या अदिवेशनात पक्षाची अगामी काळातील रणनिती ठरविण्यात येणार असून जनतेच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विचार मंथन होणार आहे. या अधिवेशनास रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी तुळजापूर तालुक्यातील रिपाइं कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात मोठया संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन एस.के. गायकवाड ,अरूण कदम, बाबासाहेब बनसोडे, अरूण लोखंडे, विठ्ठल जोटीथोर, प्रकाश कदम, निर्मला भिसे, चंद्रकांत दुपारगुडे, शिवाजी कदम, दत्ता बनसोडे आदींनी केले आहे.