पांगरी :- भरधाव वेगात निघालेल्या एस.टी.बसने दूध घेऊन निघालेल्या टाटा एस गाडीस पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी होऊन वाहनाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना  दि.7 मंगळवारी पुणे-लातूर राज्यमार्गावर कुसळंब ता.बार्शी येथील शिवारात घडली. 
   राजेंद्र दिलीप चौधरी वय 24 रा.पिंपळवाडी ता.बार्शी असे अपघातातील जखमी चालकाचे नाव असून त्याच्यावर बार्शीच्या खाजगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहे. राजेश चौधरी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  त्यांच्या ताब्यातील एम.एच.13 ए.एन.9545 हे टाटा एस कंपनीच्‍या वाहनातून पांगरीतून दूध घेऊन बार्शीच्‍या दूध पंढरीच्या संकलन केंद्राकडे जात होते. दरम्यान त्याची गाडी कुसळंब येथील उतारावर आली असता रस्त्यावर खड्डे असल्यामुळे ते सावकाश जात असताना पांगरीहून आलेल्या निलंगा-पुणे (एम.एच.20.बी.एल.2576) ह्या बसच्या चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयतन केला.तेवढ्यात समोरून दुसरे वाहन आल्याने एसटी बसने त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.त्यामुळे गाडीने पालट्या खावून आतमधील दूध सांडून व मोडतोड होऊन नुकसान झाले.चौधरी यांच्या फिर्यादीवरून बस चालक उमाजी चांदर कोळी रा.निलंगा जि.लातूर यांच्याविरुद्ध बस भरधाव वेगात चालवून धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी गुन्हा (आज दि.8)दाखल करण्यात आला आहे॰अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.

 
Top