नळदुर्ग:- हंगरगा नळ ता. तुळजापूर येथे गुरूवार रोजी दुपारी साठवण तलावातील पाण्यात बुडून चार बालकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. राठोड तनिष सुभाष (वय 10), उमेश मोहन जाधव (वय 10) चव्हाण अरूण आंबादास (वय 11), राठोड सुमित बळीराम (वय 9), सर्व राहणार वसंतवाडी तांडा, आष्टा कासार ता. लोहारा असे मरण पावलेल्या बालकांचे नावे आहेत.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लो
हारा तालुक्यातील आष्टा कासारच्या वसंतवाडी तांड्यातील वरील बालके हंगरगा नळ ता. तुळजापूर शिवारातील साठवण तलावात गुरूवार रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यासाठी गेले असता, तलावात बुडून वरिल चौघा बालकांचा मृत्यू झाला. यावेळी वरील मयत चौघा बालकासंमवेत सुमित संजय राठोड हा होता. मात्र तो तलावात न गेल्यामुळे या घटनेत बालंबाल बचावल्याचे सांगण्यात आले. ही घटना घडताच हंगरगा गावातील संजय वाघोले, प्रशांत हत्ते यांनी धाव घेवून मदत केली. मयत बालकांचे पालक उसतोड कामगार असून बाहेरगावी आहेत. ही घटना समजताच घटनास्थळाकडे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.वाय.डांगे, हवालदार मनगिरे यांनी भेट दिली.