उस्मानाबाद - शासकीय सेवेतील सेवानिवृत्त आणि सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमछत्र कार्डचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना सेवाभाव व प्रामाणिकपणे कार्य केल्यास आपल्यातील कार्यक्षमता वाढेल शिवाय आपणास आध्यात्मिक बळ मिळते, असे प्रतिपादन डॉ. नारनवरे यांनी केले.
येथील जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित सेवा निवृत्त झालेल्या व सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नारनवरे बोलत होते. कोषागार अधिकारी राहूल कदम यांची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी सेवानिवृत्त झालेल्या व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 81 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. न्यु इंडिया इन्शुरंस कंपनी यांचेकडून 23 कार्ड प्राप्त झालेल्या लाभधारकास प्रतिनिधीक स्वरुपात डॉ. नारनवरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
येथील जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित सेवा निवृत्त झालेल्या व सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नारनवरे बोलत होते. कोषागार अधिकारी राहूल कदम यांची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी सेवानिवृत्त झालेल्या व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 81 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. न्यु इंडिया इन्शुरंस कंपनी यांचेकडून 23 कार्ड प्राप्त झालेल्या लाभधारकास प्रतिनिधीक स्वरुपात डॉ. नारनवरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.