उस्मानाबाद - शासकीय सेवेतील सेवानिवृत्त आणि सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमछत्र कार्डचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना सेवाभाव  व प्रामाणिकपणे कार्य केल्यास आपल्यातील कार्यक्षमता वाढेल  शिवाय आपणास  आध्यात्मिक बळ ‍मिळते, असे प्रतिपादन डॉ. नारनवरे यांनी केले.
       येथील जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित सेवा‍ निवृत्त झालेल्या व सेवानिवृत्त  होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.  नारनवरे बोलत  होते. कोषागार अधिकारी राहूल कदम यांची यावेळी उपस्थिती होती.     याप्रसंगी सेवानिवृत्त झालेल्या  व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 81 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. न्यु इंडिया इन्शुरंस कंपनी यांचेकडून 23 कार्ड प्राप्त झालेल्या लाभधारकास प्रतिनिधीक स्वरुपात  डॉ. नारनवरे यांच्या हस्ते ‍ वितरण करण्यात आले.
 
Top