उस्मानाबाद -   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम सी. विद्यासागर राव हे जानेवारी महिन्यात उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते तुळजापूर तालुक्यातील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला तसेच टंचाईग्रस्त भागातील गावांना भेटी देण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक घेतली.   
    जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी विविध विभागांनी करावयाची तयारी आणि कार्यवाहीबाबत संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  बी. एन. उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.    
 
Top