उस्मानाबाद -  ‍जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 24 मार्च रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात त्रैमासिक जिल्हा सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
            या दरबारात माजी सैनिक/ विधवांनी आपल्या अडी-अडचणीबाबतचे निवेदन आवश्यक त्या कागदपत्रासह लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे 20 मार्चपर्यंत दोन प्रतीत सादर करुन दरबाराचे वेळी समक्ष हजर राहावे, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top