बार्शी - तालुक्यातील वैराग भागातील मुंगशी (वा.), ऐरेवाडी, भागाईवाडी, वाळूज, कौठाळी परिसरात गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह झालेल्या पा
वसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंगावर लोखंडी अँगल पडल्याने तिघेजण जखमी तर पोल्ट्री फार्मवरील पत्र्ये पडून सुमारे दिडशे कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत.
   आवकाळी पावसाने घरे, जनावरांचे गोठे, पत्र्यांचे शेड, गु-हाळ गृहे, द्राक्ष बागा, आंबा पपई इत्‍यादी प्रकारचे वृक्ष पडले आहेत. वादळी वा-याने 40 ते 45 ठिकाणचे विजेचे खांब पाडून तारा तुटल्‍याने अनेक ठिकाणाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. 


 
Top