कळंब (भिकाजी जाधव)   मराठवाड्यातील दलित नेते तथा मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. एकनाथ आवाड यांचे सोमवारी सकाळी हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना कळंब येथील पंडीत जवाहरलाल बाल उद्यान येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
          आवाड यांच्या निधनाने दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 
बीडमधील एका छोट्या गावात एकनाथ आवाड यांचा जन्म झाला होता. मातंग समाजात जन्मलेले एकनाथ आवाड यांचे बालपण हलाखीच्या स्थितीत गेले. जातीव्यवस्थेचे चटके सोसत आवाड यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पोतराज प्रथेला विरोध दर्शवत आवाड यांनी दलितांसाठी पहिला लढा दिला. यानंतर जातीभेद, नामांतर चळवळ, सावकारकी, एक गाव एक पाणवठा असे असंख्य लढे त्यांनी दिले. मानवी हक्क अभियान या मोहीमेतून आवाड यांनी  ५० हजार दलितांच्या जमिनी वाचवल्या. संयुक्त राष्ट्राच्या जिन्हिवा येथील राष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 
गेल्या काही दिवांपासून आवाड यांना पोटाच्या आजाराने ग्रासले होते. यासाठी त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दि.२६ मे मंगळवार रोजी सकाळी १० वाजता तेलगांव ता. माजलगांव जि.बीड येथे त्यांच्यावर अंत़्यसंस्कार केले जाणार आहेत, कळंब येथे संपन्न झालेल्या शोकसभेच्या अध्यक्षपदी महादेव महाराज आडसूळ हे होते यावेळी प्रा.संजय कांबळे, प्रा.खांडके, आश्रूबा गायकवाड, माधवसिंह राजपूत, शिनगारे गुरूजी, कॉ.बजरंग ताटे यांनी एकनाथ आव्हाड यांच्या आठवऩी आपल्या भाषणातून व्यक्त करून श्रद्धांजली अर्पन करण्यात आली यावेळी विक्रम शिंदे, राजू शेख, प्रकाश धावारे, माया शिंदे, त्रिवेनी पोटभरे सचिन क्षिरसागर, सुनिल कांबळे, भिकाजी जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top