नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) शिवारातील एका शेतात बैलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना मंगळवार रोजी घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
    श्रीशैल्य मारुती दळवे (वय ४५, रा. अणदूर, ता. तुळजापूर) असे बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतक-याचे नाव आहे. यातील श्रीशैल्य दळवे हे मंगळवारी दुपारी शेतातून घराकडे येत होते. त्यावेळी अंतर्गत रस्त्यावर त्यांना बैलाने पोटात शिंग मारले. यामुळे दळवी हे रस्त्यावर बेशुद्ध पडले होते. अणदूर येथील प्रा. आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहचण्यापूर्वीच श्रीशैल्य दळवी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रा. आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सिकरकर यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
 
Top