तुळजापूर -: गेल्या १५ वर्षांत केलेली विकासकामे, शेतक-साठी केलेली मदत आणि तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणलेला भरघोस निधी या जोरावर जनतेने भरभरून मते दिल्याचे माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले.
    अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजयानंतर प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर आमदार चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, भारत कदम आदी उपस्थित होते.
    आमदार चव्हाण म्हणाले की, आगामी कालावधीत तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच उजनीच्या पाण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    मधुकररावचव्हाण यांच्या विजयानंतर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंचायत समितीपासून वाजत-गाजत विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पुजारी मंडळ मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी शहरात प्रवेश करताच अामदार चव्हाण यांनी सर्वप्रथम कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी शहरात ठिकठिकाणी समर्थकांनी चव्हाणांचे स्वागत केले. शहरात सकाळपासूनच फटाके फोडून कुंकवाची उधळण करण्यात येत होती.
 
Top