बार्शी -  गौडगाव (ता.बार्शी) येथील संतोष जयसिंग लाटे (वय ३८) या शेतकर्‍याचा खून झाल्याने गौडगाव व परिसरात खळबळ उडाली आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची फिर्याद मयताचे वडिल जयसिंग भिमराव लाटे (वय ६०) यांनी वैराग पोलिसात दिल्याने पोलिस तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे.
           लाटे यांनी वैराग पोलिसांत दिलेल्या फिर्यादित मयत संतोष आणि त्याचा मित्र दत्तात्रय उर्फ बाबा अरविंद भड यांच्या मित्रत्वाच्या संबधातून संतोषच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध जुळले हो
ते. संतोषचा या प्रकारास विरोध असल्याने त्या विरोधचा राग मनात धरुन हा खून करण्यात आला. शनिवारी शेतात ज्वारीची मोडणी, काढणी व खळे सुरु असल्याने लाटे कुटूंबीय शेतामध्ये राबत असतांना इकडे मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने खूनाचा कट रचला. शनिवारी रात्री मयत संतोष हा शेतातील कामे करुन थकून शेतात झोपला असताना झोपेत त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला. झालेल्या हल्ल्यात संतोष याच्या डोक्यावर, गळ्यावर, तोंडावर जखमा होऊन रक्तस्त्राव झाला. झोपेत असतांना गालावर आलेल्या हाताची बोटेही हातावेगळी करुन निघृण हत्या करण्यात आली व झोपल्याजागीच त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी श्वानपथक, ठसेताज्ञांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक मधुकर पवार, सहा.पो.नि.उमाकांत शिंदे, सहा.पो.नि.हर्षल एकरे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास हर्षल एकरे हे करीत आहेत. संतोष याच्या पश्‍चात वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घटनेनंतर गौडगाव परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली होती.

 
Top