उस्मानाबाद - महाराष्ट्र प्रज्ञाशोध परिक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी अभिषेक अरूण क्षीरसागर आणि रोहित रंगनाथ क्षीरसागर यांनी अनुक्रमे 180 व 170 गुण घेवून तेर केंद्रातून दुसरा व तिसरा क्रमांक मिळविले आहे. त्
याचबरोबर मंगेश चौरे, प्रणिता क्षीरसागर, रेणूकाचौरे, कानिफनाथ बनसोडे, सुनैना बिटे, सुमैय्या मुजावर, या विद्यार्थींनीही यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक संजय धोंगाडे, प्रशांत कांबळे, संतोष डोके यांचे मार्गदर्शन लाभले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.