काटी : उमाजी गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील शेतकरी बाळु दत्तोबा जगताप यांच्या रविवार दि.12 रोजी दुपारी तीन वाजता सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे गट न. 350 मधील पॉलिहाऊसचा कागद फाटुन लाखोचे नुकसान झाले असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

 तामलवाडी येथील शेतकरी बाळु दत्तोबा जगताप यानी फलोत्पादन अभियान अंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी यांच्याकडुन कर्ज घेऊन त्यांच्या शेतामध्ये गट नं.350 मध्ये 20 गुंठे जमीनीवर पॉलिहाऊसची उभारणी केली.त्यामध्ये त्यानी आपला मुलगा ज्ञानेश्वर जगताप यांच्या मदतीने जरबेरा फुलांची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली परंतु कोरोना या जीवघेण्या विषाणूने जगभरात थैमान घातल्याने देश लाॅकडाऊन करण्यात आला संपुर्ण देशच बंद झाल्याने फुलशेतीवर संक्रात आली आणी फुले उपटुन टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.अशातच दि.12 रोजी दुपारी 3 वाजता अचानक वादळी वारे सुटले आणि क्षणात लाखो रूपये खर्चुन उभारलेल्या पॉलिहाऊसचा कागद फाटला अन् जगताप यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.कोरोनामुळे अगोदरच फुलशेतीवर संक्रात आली असताना त्यातच कर्ज काढून उभारलेल्या पॉलिहाऊसचे वादळी वाऱ्याने  नुकसान झाल्याने आम्ही दुहेरी आर्थिक संकटात सापडलो असल्याची माहिती बाळु दत्तोबा जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
 
Top