जळकोट : मेघराज किलजे 

संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव बापू महाराज यांचे मुंबईत शुक्रवारी दि.३० ऑक्टोंबर २०२० रोजी रात्री उपचारा दरम्यान निधन झाल्याने नळदुर्ग येथे उस्मानाबाद जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात शोक व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बंजारा समाजाचे धर्मगुरू बाल ब्रह्मचारी तपस्वी संत श्री रामराव महाराज यांनी बंजारा संस्कृतीची जपणूक करणे ,दिशाहीन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.तसेच शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. संत श्री रामराव बापू महाराज यांच्या निधनाने एका प्रर्दिर्घ कालखंडाला पुर्ण विराम मिळाला असून बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी हाणी झाली असल्याची भावना जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केली. 

यावेळी हरिष जाधव, वैभव जाधव, अमृता चव्हाण, संजय राठोड, प्रा. सुभाष राठोड, दामाजी राठोड, लक्ष्मण चव्हाण, एम.पी.राठोड, डी.यु.राठोड , सुर्यकांत राठोड,राजु चव्हाण, पिन्टु जाधव, कुमार राठोड, वसंत राठोड, यांच्या सह बंजारा बांधव उपस्थित होते.

 
Top