धाराशिव ,दि.२० सप्टेंबर
"३५० " वा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पञ व्यवहारवर बोधचिन्ह वापरण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले असुन त्याची अमंलबजावणी करावी याकरिता शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना बुधवार रोजी निवेदन देण्यात आले.
350 वा शिवराज्याभिषेक निमित्त शिवकालीन मंगलचिन्हे आणि महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे पत्र व्यवहारात वापर करणे तसेच सदर बोधचिन्हाचे शासकीय कार्यालयामध्ये दर्शनी भागामध्ये चित्र फोटो फ्रेम लावण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 8221/प्र.क. 459/ हा.का.4 मंत्रालय मुंबई दि. 24 जुलै 2023 अन्वये शासन आदेश पारित झालेला आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रचार प्रसिद्धीत तसेच शासकीय पत्र व्यवहारात सदर बोधचिन्हाचा कटाक्षाने वापर करण्याचा आदेश झालेला होता.परंतु सदर आदेशाचे बहुसंख्य कार्यालयांमध्ये पालन होताना दिसून येत नव्हते.यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सदर बोधचिन्हांचे वापराबाबत तसेच फोटो फ्रेम बाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये शासन निर्णय तसेच बोधचिन्हाची प्रत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकारी यानी तातडीने सर्व विभागांना आदेश काढण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी,शशिकांत खुने,जयराज खोचरे,आकाश कोकाटे, संतोष घोरपडे, अॅड. संजय शिंदे, अच्युत थोरात मेजर,विष्णू यमपुरे,दत्तात्रय साळुंके,योगेश आतकरे इत्यादी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते .