परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी ब्राह्मण समाजाचे उपोषण
नळदुर्ग,दि.३०
भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी जालना येथे दिपक रणनवरे यांच्या समर्थनार्थ,व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नळदुर्ग शहरातील ब्राह्मण समाजाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर गुरुवार दि.३० रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणास नळदुर्ग शहर भारतीय जनता पार्टी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शहर शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे गट) शहर पत्रकार संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) बी आर एस आदीच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. दरम्यान माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
ब्राह्मण समाजाच्या वतीने जालना येथे समाजाचे नेते दिपक रणनवरे यांच्या समर्थनार्थ व भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे,प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजातील विद्यार्थीसाठी वसतिगृह उभारणे,बालवाडी ते उच्च पदवी पर्यंतच शिक्षण मोफत मिळावे,5 लक्ष रु पेक्षा कमी उत्पन्न असणारे ब्राह्मण कुटुंबाकरिता पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे,सर्व आजारावर मोफत उपचार मिळावेत,इनामी जमिनी हक्क परत मिळावेत,पुरोहिताना मासिक 5 हजार रु मानधन मिळावे,बेरोजगारांना विना सिबिल,विना तारण 5 लक्ष रुपये कर्ज देण्याची व्यवस्था करावी,ब्राह्मण समाजाच्या सुरक्षतेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातून मुक्तता करावी,ब्राह्मण समाजाच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची/आयोगाची शासन स्तरावर नेमणूक करण्यात यावी.आदी मागण्यासाठी नळदुर्ग येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले,
यावेळी समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी,सचिव मुकुंद नाईक,माजी नगरसेवक दिलीप कुलकर्णी,प्रदीप ग्रामोपाध्ये,प्रमोद कुलकर्णी,उमेश नाईक,सचिन भूमकर,सौरभ कुलकर्णी,ज्ञानेश्वर केसकर,अजय देशपांडे,सनी भूमकर,पांडुरंग कुलकर्णी,सुधीर पुराणिक,सुभाषराव भूमकर,विशाल कुलकर्णी,यांच्या सह ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होता. शेवटी नायब तहसीलदार एस. आर. ढवळे यांनी निवेदन स्वीकारले.