नळदुर्ग ते तुळजापूर रस्त्यावरील धोकादायक खड्डा अखेर नागरिकांनी बुजविले

नळदुर्ग,दि.२९:

महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना नाहकच त्रास सहन करावा लागत असुन अनेकदा अपघात होवुन जखमी झाल्याची घटना घडत असल्याचे पाहुन नागरिकांनी स्वता: पुढाकार घेऊन धोकादायक खड्डा बुजविले आहे.

नळदुर्ग ते तुळजापूरकडे  जाणाऱ्या मार्गावर वसंतनगर येथिल भगीरथ कारखान्या समोर  रस्त्यावर मोठा धोकादायक खड्डा पडला होता.विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यात रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झाले होते . दर्जाहीन काम झाल्याने अल्पावधीतच रस्त्यावर खड्डा पडला.त्यामुळे वारंवार रस्त्यावर अपघात होत असल्याचे पाहून वसंतनगर येथिल रवी महाराज राठोड यांनी पुढाकार घेऊन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, अनिल राठोड, सुर्यकांत चव्हाण, खंडू माने, दयानंद जाधव यांच्यावतीने  बुधवार दि.२८ मे  रोजी सकाळी नऊ वाजता रस्त्यावर खडी ,मुरुम टाकुन खड्डा बुजविले . त्यामुळे वहानचालकातुन वरील सामाजिक कार्यकर्तेचे अभिनंदन केले जात आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top