भाजपच्या वतीने किल्ला गेट येथिल आयोजित जनता दरबारात ४१ तक्रारी नोंदवल्या; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नळदुर्ग,दि.१९ जुलै 


भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार दि.१९ जुलै रोजी नळदुर्ग शहरातील प्रभाग क्रमांक ६ किल्ला गेट येे   सकाळी १० ते १ वाजण्याच्या कालावधीत आयोजित जनता दरबारात सर्वाधिक पाणी पुरवठा व स्वच्छतेसह ४१ तक्रारी नोंदविल्या गेल्या असुन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संकल्प ते सिद्धी अभियान नरेंद्र मोदी सरकारचे  अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांच्या नेतृत्वाखाली  किल्ला गेट येथे जनता दरबार आयोजित करण्यात आले होते . यावेळी नागरिकांनी ४१ तक्रारी नोंदविल्या .त्यामध्ये प्रामुख्याने  पाणी पुरवठा, स्वच्छता, शासकीय जागेवर राणा-या  कुटुंबाना रमाई आवास योजनेचे लाभ मिळावेत , सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, बंद असलेले पथदिवे चालु करणे आदी तक्रारीचा समावेश आहे.

साठे नगर येथे राहणाऱ्या बहुतांश कुटुंबाच्या घर जागेची नोंद न.प. दप्तरी घेवुन सर्व लाभार्थ्यांना भोगवटदार नोंदणीची नक्कलन.प. प्रशासनाने दिली असुन प्रधानमंत्री आवास योजन/ रमाई आवास योजनेचे त्वरित लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
  
याप्रसंगी भाजपचे नेते सुशांत भूमकर , नळदुर्ग शहर तालुका अध्यक्ष बसवराज धरणे, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार,  माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार,  पांडुरंग पुदाले,  संदीप गायकवाड, माजी नगराध्यक्षा मुनव्वर सुलतान कुरेशी,
उमेश नाईक, पप्पू पाटील, गौस शेख, सलीम बागवान, एस के बागवान, सिकंदर काझी, इब्राहिम कुरेशी, आसेय काझी, सादिक कुरेशी, नजिम शेख आदीसह नागरिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौस शेख यांनी केले तर आभार शिवाजी गायकवाड यांनी मानले.
 
Top