अहिल्यादेवी जयंतीनिमित्त वृक्षारोपण; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते  राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

​धाराशिव,दि.०१ :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुळहाळी ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे सोमवार दि.०१जुलै रोजी भव्य वृक्षारोपण  करण्यात आले.

 या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) निष्ठावंत कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते  राहुल शंकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती  होती. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला.
प्रारंभी  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  राहुल  चव्हाण यांनी अहिल्यादेवींच्या प्रशासकीय, सामाजिक आणि जलसंधारणाच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देत "अहिल्यादेवींनी आपल्या प्रजेसाठी आणि निसर्गासाठी केलेले कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले.  

​पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही  सर्वांची जबाबदारी आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. या वृक्षारोपण मोहिमेत नारळ, अशोक, पिंपळ, चिंच आणि इतर  विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. ​याप्रसंगी  सरपंच तानाजी बनछेरे , माजी तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पाटील,  मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव लांडगे, रुपामाता शूगर इंडस्ट्रीजचे ऊस पुरवठा अधिकारी भाऊसाहेब रेकळेगे , नागेश हलकंबे,   प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळाचे पदाधिकारी, आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार  खंडु हलकंबे यांनी मानले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top