बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर) : बार्शी तालुक्यातील जनतेने तालुक्यातील शांततेसाठी आणि विकासासाठी दिलीप सोपलच अंतीम पर्याय असल्याचे निवडणूक निकालातून दाखवून देवून दहशतीला चोख उत्तर दिल्याची प्रतिक्रीया औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल यांनी दिली.
    ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील जनता शांतता आणि विकासप्रिय आहे. दहशतीच्या, गंडगिरीच्या प्रवृत्तीला मतदारांनी मतदानातून चोख उत्तर दिलेले आहे. धनशक्तीच्या मार्गाला मतदारांनी झिडकारले आहे. तसेच भाजप च्या निमित्ताने सुशिक्षीत उमेदवार दिल्यामुळे मतविभागणीचा आम्हाला फटका बसला. लोकसभेच्या निवडणुकीवेळचा 55 हजाराचे मताधिक्य कमी करुन 5111 मतांनी इतका अल्पावधीत मिळालेला विजय सर्व विकासप्रिय जनतेचा विजय आहे असे मी मानतो.
    या तालुक्यात गुंडगिरी, दहशत चालू दिली जाणार नाही. कायदेशीर मार्गाने त्याचा बिमोड करुन प्रसंगी जशास तसे उत्तर देवू पण तालुक्यातील शांतता अबाधित ठेवूच असेही ते म्हणाले.
 
Top