बार्शी -  निवडणुकांपूर्वी आपण दिलेल्या आश्वासनांत असलेल्या संतनाथ सहकारी साखर कारखाना वर्षभरात सुरु होणार आहे. त्याचबरोबर पाच वर्षात वैराग तालुका निर्मितील केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. कारखाना चांगला चालू दे असे साकडे बाशीचे ग्रामदैवत भगवंत आणि वैरागचे ग्रामदैवत संतनाथाला घातले असल्याचे प्रतिपादन भाजपानेते राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केले.
शेतकरी हिताचा न्यायालयाच्या निर्णयाचा आनंद व्यक्त करत छत्र
पती शिवाजी महाराज, जगदाळे मामा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करुन शहरातून छोटेखानी मिरवणूक काढून तेलगिरणी चौकातील आरएसएम हाईटसजवळ शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शाम रणशूर, विश्वास पाटील, किरण गायकवाड, गोविंदराव पंके, शिवाजी संंकपाळ, भडोळे, दत्ताआण्णा साळुंखे, छोटूभाई लोहे, धनंजय जाधव, शशिकांत पवार आदी उपस्थित होते.
 

 
Top