नळदुर्ग - बाल वयांत ज्यांना ग, म, भ, न चा धडा गिरवायला शिकवायचे तिथे वाढदिवसाचे व प्रसिद्धीचे साधन म्हणुन प्राथमिक शाळाचा व बालवाड्याचा असा ही उपयोग सुरू झाल्याने पालकांतुन संताप व्यक्त केला जात आहे.
राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्यासह अनेकांचे वाढदिवस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजरा करण्यात आला. संबंधित नेते, प्रमुख कार्यकर्ते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी सर्वत्र उत्साहाने व विविध कार्यक्रमाने साजरा केले. नळदुर्ग शहरांमध्येही संबंधितास चाहत्यांनी खुष करण्यासाठी शाळा, बालवाड्यांचा आधार घेवून कार्यक्रम साजरा केला.
राजकीय पक्षांना प्रसिद्धीची हाव लागली असून कोणतेही सामाजिक काम न करता राजकीय खुर्चींना चिकटून बसुन वारेमाप पैसा उधळून गैरप्रकार केल्याने समाजात पक्षाच्या नेत्याची व कार्यकर्त्यांची किंमत कवडीमोल होऊन घसरत चालली असून काही केंद्रीय मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून सध्या तुरूंगाची हवा खावी लागत असल्याचे सर्वश्रूत आहे. अनेक राजकीय नेत्यांना खूष करण्यासाठी डिजिटल जमान्यात प्रसिद्धीसाठी यापूर्वीच कार्यकर्त्यांनी मोठ-मोठ्या होर्डिंग ङ्गलकाचा वापर केला आहे. कार्य कमी पण डिजिटल बोर्ड मोठ-मोठे लावले. सध्या धावत्या जमान्यात मध्यमवर्गीय नागरिकांना स्वत:चे पोट भरणे मुश्किल झाले आहे. सर्वसामान्य नागरीक पोटापाण्यासाठी धावाधाव करीत असताना रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या कथित होर्डिंग बोर्डाकडे ढुंकूनही पाहण्यास त्यांना वेळ मिळेना. हे होर्डिंग रस्त्यावर तसेच उभे राहू लागल्याने नेत्यांना व कार्यकर्त्यांना आपल्या प्रसिद्धीची पुन्हा चिंता वाटू लागली व जनसंपर्कासाठी इंटरनेटच्या जमान्यात काहींनी ङ्गेसबुकचा आधार घेतला. तर काहींनी नवनव्या कल्पत्या लढवून आता बालवाड्या व शाळांमधुनही राजकारण सुरू करीत असल्याचे दिसत आहे. यापुर्वी वाढदिवसानिमित्त ङ्गळ-ङ्गळावळ, खाऊ, वही, पुस्तक, पेन्सिल, शालेय साहित्य वाटप केले जायचे. वाटप करणार्‍यांचे नावही समजायचे नाही. परंतु गरिबीचा ङ्गायदा घेत मदतीचा हात दाखविण्याच्या नावाखाली वह्यावर राजकीय नेत्यांचे ङ्गोटो लावले जात आहे. बाल वयात ज्या बालकांस ग, म, भ, न चा धडा गिरवायला शिकावयचे तिथे राजकारणांतुन राजकीय नेत्यांचे ङ्गोटो छापल्याने आगामी काळात शाळेतूनच राजकारणाचे पाठ गिरवावे लागतील की काय? अशी भिती पालकांना वाटत असून याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.
 
Top