तुळजापूर :- सराटी (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीचे भारत संचार निगम लिमिटेडचे तरंग फोनचे मनोरा असे वृक्षलीने वेढलेले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून बीएसएनएलचा हा मनोरा वेलीने वेढलेला आहे. दरवर्षी ग्रामपंचायतीने शक्य होईल तेवढे वेल ओरबडून काढतात. मात्र मनोरा उंच असल्याने अधिक उंचीवरील वेल काढता येत नाही. पावसाळ्यात पुन्हा वेल वरून खाली झपाट्याने येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. छायाचित्र श्री व्यंकटेश्वर यांनी टिपले आहे.