बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्‍या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात सामाजिक कार्याबद्दल बार्शी तालुक्यातील राजेंद्र मिरगणे यांना सन्‍मानित करण्यात आले.
     सासवड (ता. पुरंदर) येथे मंगळवार दि.12 मार्च रोजी हे साहित्य संमेलन पार पडले. यावेळी ज्येष्ठ इतिहासकार रा.आ.कदम, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्‍तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, विकास पासलकर, सागरनाना जगताप, राष्ट्रीय कायार्ध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय विश्वस्त दशरथ यादव, अभिजीत जगताप, प्रशांत पाटणे, चित्रपट निर्मात्‍या निमसे ताई आदि मान्यवर उपस्थित होते.
     ग्रंथदिंडी, ज्योत आल्यावर दिप प्रजज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दशरथ यादव यांनी प्रास्ताविक केले. यानंतर विविध सामाजिकक उपक्रमातील मान्यवरांचा स्‍मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार देण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये बार्शीचे राजेंद्र मिरगणे यांना छत्रपती संभाजी महाराज समाज पुरस्कार, माढा येथील गोरक्षनाथ भांगे यांना युवा भूषण, कळंब येथील सौ. साधना बागरे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्‍लेखनिय कामाबद्दल पुरस्कार, मंजुषा काटकर यांना नाट्यकलेतील सामाजिक गौरव, पूजा कला केंद्रातील नृत्यांगणा रेणुका ढगे यांना युवती नृत्यांगणा पुरस्कार, अशोक नावले यांना सामाजिक युवा गौरव, पाटस (ता. दौंड) येथील नवनाथ कुरुमकर यांना सामाजिक गौरव, पॅरामेडिकल असोसिएशनचे डॉ. अरविंद पंडित खरात यांना समाज गौरव, शांताराम पातंगे यांना युवा उद्योग रत्न, कृष्णकांत कोबल यांना पत्रकारिता, चिळली (ता. मोहोळ) येथील ज्ञानदेव यादव यांना जीवन गौरव, दिलीप शिंदे यांना आदर्श शिक्षक, विक्रम सावंत यांना समाजरत्न, भारती सावंत यांना माता जिजाऊ पुरस्कार, जालना येथील किसनराव मोरे यांना सामाजिक कार्यगौरव, बिपीन नाईक यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्‍मानित करण्यात आले.
     यावेळी बोलतांना प्रवीणदादा गायकवाड म्‍हणाले, आपल्या देशाच्या वैशिष्ट्यामध्ये आपणास जीवंतपणी काहीच मिळत नाही. खेडेकर साहेबांनी साहित्य चळवळ उभी केली आहे. साहित्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे. ब्राह्मण हे आमचे शत्रू नसून काहींनी सांस्कृतिक शोषण केले. त्रस्तपणे आपली बाजू मांडणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्यीक असल्याचे चित्रसमोर आले आणि त्यांच्या हातात तलवारीऐवजी पुस्तक पाहून काहीजणांच्या मनात चिड निर्माण होऊ लागली. काही ब्राम्हणांनी काही पात्रे जाणीवपूर्वक निर्माण करुन साहित्य व इतर मार्गाने लोकांमध्ये सत्य असल्यासारखी रुजवली व तोच खरा इतिहास असल्याचे लोक समजू लागले. सांस्कृतिक इतिहास हा ब्राह्मणी आणि विद्रोही अशा दोन विभागात विभागला गेला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत विद्रोही तुकाराम या विषयावर चर्चासत्र झाले त्यात विद्रोह हे बंड असल्याची जाणीव करुन देण्यात आली. मराठी साहित्य समेलन आणि मराठी साहित्य परिषद ह्या दोन्ही बरोबरीने चालत असतांना चिपळूनला परशुरामाच्या छायाचित्रावरुन वाद झाला. काही लोक जाणीवपूर्वक दुफळी निर्माण करत असून ज्यांच्या छायाचित्राचा अन् साहित्य संमेलनाचा अर्था संबंध नाही त्यांनी अशा प्रकारचे कृत्य हे जाणीवपूर्वक केले होते. प्रत्येक जातीधर्माच्या देव आणि प्रेरणा या भिन्न असू शकतात त्या इतरांवर लादणे योग्य नाही. मराठीच्या बाबत बोली भाषेतील मराठी आणि प्रमाणभूत मराठीमध्ये मोठी तफावत आहे. 95 टक्के लोक जे भाषा वापरतात त्याला आधारभूत भाषेचा अथवा प्रमाणभूत दर्जा देणे आवश्यक आहे. आपल्याला सांस्कृतिक इतिहास माहित नसल्याने अक्षय तृतीया या परशूरामाच्या जयंती दिवशी आपण सण साजरे करतो. साहित्य आपले असावे, महात्‍मा फुलेंच्या साहित्यात ग्रामर कच्चे असल्याची टिका चिपळूणकरांनी केली. परंतु लोकांनी त्या साहित्यालाच साहित्य म्हटले व तेच आज बहुजनांचे साहित्य आहे. कुसूमाग्रज कोण आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी मराठी दिन का साजरा करायचा त्यांनी काय साहित्य निर्माण केले केवळ एक कवीता करुन मराठीचा वाली होत नाही. त्यांच्यापेक्षा महान साहित्य निर्मिती करणारे आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिवशी मराठी दिन साजरा का केला जात नाही. दिड दिवसांची शाळा करुनही मोठ्या साहित्याची निर्मिती करणारे आण्णाभाऊ हेच खरे साहित्यीक आहेत. एकाही मराठ्यास उवा बहुजनांस भारतरत्न का दिला जात नाही?, मराठीवर राजकारण करण्यापेक्षा मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी अथवा वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
 
Top