कळंब (बालाजी जाधव) : येथील जिल्हा परिषद प्रशालाच्यावतीने शहरातून प्लास्टीक पिशवी निर्मुलन जनजागृती रॅली काढण्यात आली. कळंब नगरपरिषदेने प्लास्टीक वापरावर बंदी आणण्याचा ऐतिहासिक निर्णय ठरावाद्वारे घेतला. त्याची सर्व नागरिकांनी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून प्रशालेच्या विज्ञान व पर्यावरण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन प्लास्टीक निर्मुलनासाठीच्या घोषणा दिल्या.
रॅलीमध्ये विज्ञान व पर्यावरण मंडळातील विद्यार्थी, तसेच इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी ताटे युवराज, चोंदे अक्षय, माळी राहुल, सुजीत चव्हाण, शशिकांत चंदनशिवे, ताहेर शेख आदी विद्यार्थी होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक ढवळे बी.डी., श्रीमती इनामदार एम.एम., सोमीन ए.आय., उस्मानी एन.झेड., पवार आर.एस., बेडके सचिन, वाघमारे दिनेश, अन्सारी आदीनी परिश्रम घेतले.
रॅलीमध्ये विज्ञान व पर्यावरण मंडळातील विद्यार्थी, तसेच इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी ताटे युवराज, चोंदे अक्षय, माळी राहुल, सुजीत चव्हाण, शशिकांत चंदनशिवे, ताहेर शेख आदी विद्यार्थी होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक ढवळे बी.डी., श्रीमती इनामदार एम.एम., सोमीन ए.आय., उस्मानी एन.झेड., पवार आर.एस., बेडके सचिन, वाघमारे दिनेश, अन्सारी आदीनी परिश्रम घेतले.