उस्मानाबाद -: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या वतीने पुणे, सांगली, मुंबईसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उस्मानाबाद, तेर, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब आणि परंडा येथील  आगारातून पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय भूमहून सांगलीसाठी, तुळजापूरहून मुंबईसाठी बसेस सोडण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
 
Top