पांगरी (गणेश गोडसे) : पुणे लातुर राज्यमार्गावरील टेंभुर्णी ते येडशी या 93 किलो मीटर अंतराच्या टप्प्याच्या रूंदीकरणाच्या कामाची निविदा पुणे येथील कंपनीने घेतल्याच्या चर्चेमुळे व रूंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या कामांनी गती घेतली आहे. या मार्गावरील शेतक-यांच्या जमीनी व मोठमोठया इमारती शाळा यासह शासकीय वास्तुंनाही या रूंदीकरणाच्या कामात हानी पोहचण्याच्या भितीने अनेकजण धास्तावले असुन रस्ता मोठा होऊन अपघाताच्या संख्येत घट होणार असल्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्यांमधुन मात्र समाधान व्यक्त केले जात असुन अनेक वर्षांपासुन रखडलेला रूंदीकरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशीही वाहनधारकांची मागणी आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने सोय होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रशासनाने टेभुर्णी ते येडशी या 93 कि.मी.अंतराच्या राज्य मार्गाचे केंद्र शासन, राज्य शासन व संबंधीत ठेकेदार यांच्या संयुक्त माध्यमातुन बांधा वापरा व हस्तांतरीत करा या धोरणावर चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वारंवार निविदाही प्रसिध्द केल्या होत्या. मात्र अनेकवेळा निविदा प्रसिध्द होऊनही ठेकेदारांकडुन या मार्गाच्या कामासाठी म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. चौपदरीकरणासाठी होणारा खर्च अफाट असल्यामुळे ठेकेदारांमधुन उदासिनता दिसत होती. मात्र पुणे येथील एका खासगी कंपनीने टेंभुर्णी ते येडशी या रस्ता रूंदीकरणाच्या कामाचा ठेका घेतल्यामुळे तिन महिन्याच्या कालावधीत (दिवाळीत) रूंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
सध्या संबंधित कंपनीच्या कर्मचा-यांकडुन बार्शी पांगरी ते येडशी मार्गादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुळ मालकीच्या जागेच्या स्थान निश्चितीचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच जागेवर अनेकांनी आपली बांधकामे थाटल्याचे सध्याच्या सर्वेक्षणातुन दिसत असुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची हदद अनेकांच्या मोठमोठया बांधकामाच्याही पाठीमागे गेल्या असल्याचे निदर्शनास येत आहे. रूंदीकरणासाठी प्रत्यक्षात शासन किती जागा ताब्यात घेणार हे मात्र प्रत्यक्ष कामास सुरूवात झाल्यानंतरच समजणार आहे. सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणात वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळी मापे घेऊन स्थान निश्चिती करण्यात येत असल्यामुळे मात्र जनतेमधुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.
या मार्गावरूण दैनंदिन साडे तीन हजार वाहनांची आवक जावक होत असल्याचे सर्वेक्षणातुन सिध्द झालेले असल्यामुळे व भविष्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊनच शासनाने या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतलेले आहे. हा रस्ता वाढुन दहा मिटर रूंद डांबरीकरण व साइड पटया असा होणार असल्याचे समजते. रस्ता रूंदीकरणाच्या कामाची फाइल मंत्रालय पातळीवर कांही तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसाठी असल्याचे बार्शी बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.बळी यांनी बोलताना सांगितले. मात्र खरे वास्तव हे रस्त्याच्या प्रत्यक्ष रूंदीकरणाच्या कामास सुरूवात झाल्यानंतर व जागा ताब्यात घेतल्यानंतरच समोर येणार आहे. प्रत्यक्ष रोड किती होणार या विचाराने अनेकांचा जिव भांडयात पडला आहे. या मार्गाच्या रूंदीकरण कामाच्या पुर्ततेनंतर इतर अनेक मार्गावरील वाहतुक या रस्त्याने वळणार असुन वाहतुकीच्या प्रमाणात मोठी वाढ होणार आहे. या भागात दळणवळणाच्या सुविधा वाढल्यामुळे पर्यायाने या भागाचा विकासासाठी मोठी हातभार लागणार आहे. साधण्यास मोठी मदतही होणार आहे.
शेतक-यांच्या जमिनीच्या मावेजाचे काय?:
शासनाकडुन असो अथवा खासगी कंपनीकडुन शेतक-यांच्या शेतात दुरवर हद्द, खुना निश्चित करण्यासाठी दगड लावुन व त्यांची रंगरंगोटी करून सिमा निश्चित केली जात आहे. दगडांची हद्द अनेकांच्या बंगले घरांच्याही पाठीमागे गेलेली असुन त्यांच्या जमिनी जागा ताब्यात घेतल्यानंतर संबंधीतांना त्याचा मावेजा मिळणार का असा प्रश्न संबंधित जागामालकांकडुन विचारला जात आहे. यासंदर्भात संबंधीताकडे कोणतीच चौकशी अथवा विचारपुसही केली जात नसल्यामुळे अणेक वर्षांपासुन पिढ्या वाढलेल्या घरमालकांमधुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण 1972 च्या दुष्काळात पांगरी भागात झालेल्या पांगरी ते पाथरी या रस्त्याच्या शेतक-यांना चाळीस वर्षांचा कालावधी उलटुन जावुनही अद्यापपर्यंत मावेजा अदा करण्यात आलेला नाही.
बार्शी तालुक्यातील पांगरीत रूंदीकरणाचे काम थांबवण्याचे पत्र
राज्य मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाला पांगरी परिसरातील शेतक-यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. पांगरीपासुन पुढील येडशीकडील टप्प्यातील रूंदीकरणाच्या कामास या भागातील शेतक-यांचा विरोध असल्याचे पत्र संबंधित लघु पाटपंधारे खात्यास खात्यास देण्यात आले आहे. पांगरीजवळ प्रस्तावित असलेल्या चिंचोली, ढेंबरेवाडी साठवण तलावाच्या मधुनच नविन रूंदीकरणाचा मार्ग जात असल्यामुळे तो वळवुन बाजुने न्यावा अशीही पांगरी पंचक्रोशीमधील जनतेची मागणी आहे. साठवण तलाव मंजुरीच्या प्रतिक्षेत असुन या मार्गावरून रस्ता गेल्यास पुन्हा तलावासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. एक नैसर्गिक जागा या रस्त्यामुळे कायमची संपुष्ठात येणार असुन अगोदरच रस्ता वळवुन पर्यायी बाजुने घेऊन जाणे सायीचे ठरणार आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने सोय होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रशासनाने टेभुर्णी ते येडशी या 93 कि.मी.अंतराच्या राज्य मार्गाचे केंद्र शासन, राज्य शासन व संबंधीत ठेकेदार यांच्या संयुक्त माध्यमातुन बांधा वापरा व हस्तांतरीत करा या धोरणावर चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वारंवार निविदाही प्रसिध्द केल्या होत्या. मात्र अनेकवेळा निविदा प्रसिध्द होऊनही ठेकेदारांकडुन या मार्गाच्या कामासाठी म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. चौपदरीकरणासाठी होणारा खर्च अफाट असल्यामुळे ठेकेदारांमधुन उदासिनता दिसत होती. मात्र पुणे येथील एका खासगी कंपनीने टेंभुर्णी ते येडशी या रस्ता रूंदीकरणाच्या कामाचा ठेका घेतल्यामुळे तिन महिन्याच्या कालावधीत (दिवाळीत) रूंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
सध्या संबंधित कंपनीच्या कर्मचा-यांकडुन बार्शी पांगरी ते येडशी मार्गादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुळ मालकीच्या जागेच्या स्थान निश्चितीचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच जागेवर अनेकांनी आपली बांधकामे थाटल्याचे सध्याच्या सर्वेक्षणातुन दिसत असुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची हदद अनेकांच्या मोठमोठया बांधकामाच्याही पाठीमागे गेल्या असल्याचे निदर्शनास येत आहे. रूंदीकरणासाठी प्रत्यक्षात शासन किती जागा ताब्यात घेणार हे मात्र प्रत्यक्ष कामास सुरूवात झाल्यानंतरच समजणार आहे. सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणात वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळी मापे घेऊन स्थान निश्चिती करण्यात येत असल्यामुळे मात्र जनतेमधुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.
या मार्गावरूण दैनंदिन साडे तीन हजार वाहनांची आवक जावक होत असल्याचे सर्वेक्षणातुन सिध्द झालेले असल्यामुळे व भविष्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊनच शासनाने या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतलेले आहे. हा रस्ता वाढुन दहा मिटर रूंद डांबरीकरण व साइड पटया असा होणार असल्याचे समजते. रस्ता रूंदीकरणाच्या कामाची फाइल मंत्रालय पातळीवर कांही तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसाठी असल्याचे बार्शी बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.बळी यांनी बोलताना सांगितले. मात्र खरे वास्तव हे रस्त्याच्या प्रत्यक्ष रूंदीकरणाच्या कामास सुरूवात झाल्यानंतर व जागा ताब्यात घेतल्यानंतरच समोर येणार आहे. प्रत्यक्ष रोड किती होणार या विचाराने अनेकांचा जिव भांडयात पडला आहे. या मार्गाच्या रूंदीकरण कामाच्या पुर्ततेनंतर इतर अनेक मार्गावरील वाहतुक या रस्त्याने वळणार असुन वाहतुकीच्या प्रमाणात मोठी वाढ होणार आहे. या भागात दळणवळणाच्या सुविधा वाढल्यामुळे पर्यायाने या भागाचा विकासासाठी मोठी हातभार लागणार आहे. साधण्यास मोठी मदतही होणार आहे.
शेतक-यांच्या जमिनीच्या मावेजाचे काय?:
शासनाकडुन असो अथवा खासगी कंपनीकडुन शेतक-यांच्या शेतात दुरवर हद्द, खुना निश्चित करण्यासाठी दगड लावुन व त्यांची रंगरंगोटी करून सिमा निश्चित केली जात आहे. दगडांची हद्द अनेकांच्या बंगले घरांच्याही पाठीमागे गेलेली असुन त्यांच्या जमिनी जागा ताब्यात घेतल्यानंतर संबंधीतांना त्याचा मावेजा मिळणार का असा प्रश्न संबंधित जागामालकांकडुन विचारला जात आहे. यासंदर्भात संबंधीताकडे कोणतीच चौकशी अथवा विचारपुसही केली जात नसल्यामुळे अणेक वर्षांपासुन पिढ्या वाढलेल्या घरमालकांमधुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण 1972 च्या दुष्काळात पांगरी भागात झालेल्या पांगरी ते पाथरी या रस्त्याच्या शेतक-यांना चाळीस वर्षांचा कालावधी उलटुन जावुनही अद्यापपर्यंत मावेजा अदा करण्यात आलेला नाही.
बार्शी तालुक्यातील पांगरीत रूंदीकरणाचे काम थांबवण्याचे पत्र
राज्य मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाला पांगरी परिसरातील शेतक-यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. पांगरीपासुन पुढील येडशीकडील टप्प्यातील रूंदीकरणाच्या कामास या भागातील शेतक-यांचा विरोध असल्याचे पत्र संबंधित लघु पाटपंधारे खात्यास खात्यास देण्यात आले आहे. पांगरीजवळ प्रस्तावित असलेल्या चिंचोली, ढेंबरेवाडी साठवण तलावाच्या मधुनच नविन रूंदीकरणाचा मार्ग जात असल्यामुळे तो वळवुन बाजुने न्यावा अशीही पांगरी पंचक्रोशीमधील जनतेची मागणी आहे. साठवण तलाव मंजुरीच्या प्रतिक्षेत असुन या मार्गावरून रस्ता गेल्यास पुन्हा तलावासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. एक नैसर्गिक जागा या रस्त्यामुळे कायमची संपुष्ठात येणार असुन अगोदरच रस्ता वळवुन पर्यायी बाजुने घेऊन जाणे सायीचे ठरणार आहे.