बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जिल्ह्याचे पालकमंत्री असतांनाही सोलापूर जिल्ह्यात बार्शीवर जास्त लक्ष असल्याच्या प्रश्नावर ना. सोपल यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांची कामे आपापल्या तालुक्यावर अतिशय चांगल्या रितीने लक्ष असल्याचे तसेच विनाकारण त्यांच्या कामकाजात ढवळाढवळ करणे आवडत नसल्याचे म्हटले.
बार्शी येथील तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या तालुक्याच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते. यावेळी वैरागचे जि.प.सदस्य मकरंद निंबाळकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस नागेश अक्कलकोटे, अँड्. गुंड, भास्कर काशीद, पानगावचे माजी सरपंच सुधीर काळे, दिलीप क्षीरसागर, समीर वळसंगकर, आगलावे, पं.स.सदस्य ननवरे, बोधले, विकास पाटील, मधुकर गुंड, नवनाथ चांदणे, आबा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी साडेदहा पासून सायंकाळी ६ पर्यंत विविध विभागाच्या प्रङ्कुखांसोबत वेगवेगळ्या वेळेनुसार बैठका घेत त्यांनी संपूर्ण तालुक्यातील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी अनेक सूचना करुन अत्यावश्यक असलेल्या कामाना तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. मागील चार वर्षांपासून विविध विभागातील कामकाजाची पार्श्वभूमी व सध्या सुरु असलेल्या कामातील गतीमानता यांमध्ये निधीची उपलब्धता व प्रामुख्याने कोणत्या कामांना महत्व देणे गरजेचे आहे याची सविस्तर चर्चा झाली. येणार्या काळात संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी विशेष प्रयत्न करुन कोणतेही गाव पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेशिवाय राहणार नाही. विद्युत पुरवठ्याच्या थकबाकी असतांनाही मोठ्याप्रमाणात नव्याने करण्यात येणार्या कामांचे कोटेशन तयार करणे, मंजूरी घेणे, निविदा घेणे व कामाची सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. काही ठिकाणी विद्युत केंद्रांचा विस्तार, अतिरिक्त रोहित्रांची उपलब्धता, शेतीपंपांना नवीन कनेक्शन देणे यांवर भर देण्यात आला आहे. काही ठिकाणी जागेची उपलब्धता नसल्याने निधी उपलब्ध असूनही कामे होत नसल्याने त्याचेही योग्य त्या मार्गाने प्रयत्न करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांसाठी विशेष निधी, क्रिडा संकुलाच्या उर्वरित कामासाठी निधीची उपलब्धता, तहसिलच्या इमारत, वसतीगृहे, ग्रामीण रुग्णालयाच्या निवासस्थानांच्या कामाचा आढावा, विविध बंधार्यांच्या कामांचा, दुरुस्तीचा संपूर्ण कामकाजांवर दिवसभरात केलेल्या सविस्तर चर्चेनंतर तालुक्यातील कामकाज हे समाधानकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बार्शी येथील तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या तालुक्याच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते. यावेळी वैरागचे जि.प.सदस्य मकरंद निंबाळकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस नागेश अक्कलकोटे, अँड्. गुंड, भास्कर काशीद, पानगावचे माजी सरपंच सुधीर काळे, दिलीप क्षीरसागर, समीर वळसंगकर, आगलावे, पं.स.सदस्य ननवरे, बोधले, विकास पाटील, मधुकर गुंड, नवनाथ चांदणे, आबा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी साडेदहा पासून सायंकाळी ६ पर्यंत विविध विभागाच्या प्रङ्कुखांसोबत वेगवेगळ्या वेळेनुसार बैठका घेत त्यांनी संपूर्ण तालुक्यातील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी अनेक सूचना करुन अत्यावश्यक असलेल्या कामाना तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. मागील चार वर्षांपासून विविध विभागातील कामकाजाची पार्श्वभूमी व सध्या सुरु असलेल्या कामातील गतीमानता यांमध्ये निधीची उपलब्धता व प्रामुख्याने कोणत्या कामांना महत्व देणे गरजेचे आहे याची सविस्तर चर्चा झाली. येणार्या काळात संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी विशेष प्रयत्न करुन कोणतेही गाव पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेशिवाय राहणार नाही. विद्युत पुरवठ्याच्या थकबाकी असतांनाही मोठ्याप्रमाणात नव्याने करण्यात येणार्या कामांचे कोटेशन तयार करणे, मंजूरी घेणे, निविदा घेणे व कामाची सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. काही ठिकाणी विद्युत केंद्रांचा विस्तार, अतिरिक्त रोहित्रांची उपलब्धता, शेतीपंपांना नवीन कनेक्शन देणे यांवर भर देण्यात आला आहे. काही ठिकाणी जागेची उपलब्धता नसल्याने निधी उपलब्ध असूनही कामे होत नसल्याने त्याचेही योग्य त्या मार्गाने प्रयत्न करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांसाठी विशेष निधी, क्रिडा संकुलाच्या उर्वरित कामासाठी निधीची उपलब्धता, तहसिलच्या इमारत, वसतीगृहे, ग्रामीण रुग्णालयाच्या निवासस्थानांच्या कामाचा आढावा, विविध बंधार्यांच्या कामांचा, दुरुस्तीचा संपूर्ण कामकाजांवर दिवसभरात केलेल्या सविस्तर चर्चेनंतर तालुक्यातील कामकाज हे समाधानकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.