कळंब : रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याच्या गळीत हंगामाचा १४ वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम सहकार महर्षि शिवाजीराव नाडे यांच्या शुभ हस्ते तर नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक बी.बी.ठोंबरे, चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.
नॅचरल शुगरचा सन 2013-2014 च्या बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी बोलताना शिवाजीराव नाडे म्हणाले की, सहकारातील काही अपप्रवृत्तीला बगल देत त्यांनी खाजगी साखर उद्योगाचा आदर्श जगासमोर ठेवला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ठोंबरे यांनी साखर उद्योगाबरोबरच इतर अनेक उपपदार्थ निर्मिती, शाळा, कॉलेज, बँकींग व दवाखाना अशा विविध उपक्रमामध्ये यश मिळविलेले असून त्यांनी यापुढे सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन नाडे यांनी केले.
बी.बी.ठोंबरे म्हणाले, मागील वर्षापासून पावसाने अवकृपा केल्यामुळे कारखना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता अत्यंत कमी झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी मांजरा धरण मात्र अद्याप रिकामेच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही नॅचरल शुगरने जलसंधारणाची कामे केलेल्या गावांमध्ये विहीर, बोअरचे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
या भागातील शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी त्यासाठी कारखान्यामार्फत सवलतीचे दरात ऊस रोपाचा पुरवठा व पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनासाठी विशेष अनुदान ही कारखान्यामार्फत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर शेतक-यांनी नवीन ऊस लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून कांदा व बटाट्याचे उत्पादन घ्यावे यासाठी कारखान्यामार्फत सवलतीचे दरात बियाणांचा पुरवठा केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या साखरेचे भाव अत्यंत खाली आलेले आहेत. अशा बिकट परिस्थितीतही नॅचरल शुगरने मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसास मराठवाड्यातील सर्वाधिक भाव रु. २३०० दिलेला आहे. त्याच बरोबर कर्मचा-यांनाही सर्वाधिक दिवाळी बोनस २० टक्के देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले तसेच हा हंगाम अत्यंत अडचणीचा असला तरीही नॅचरल शुगरचे या हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट ७२५००० मे.टनाचे आहे. या हंगामात कारखाना रॉ शुगर व रिफाइंड शुगरचे उत्पादन घेणार असून ते १०० टक्के निर्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बॉयलरची पुजा कारखान्याचे इलेक्ट्रीकल मॅनेजर किरण पाटील व त्यांच्या पत्नी सौ. किर्ती पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ए.एम.गुजर प्रास्ताविक पांडूरंग आवाड संचालक, आभार दिलीपराव भिसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिवाजीराव लकडे, लालासाहेब पाटील, काळदाते, संचालक, प्रवर्तक, शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.
नॅचरल शुगरचा सन 2013-2014 च्या बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी बोलताना शिवाजीराव नाडे म्हणाले की, सहकारातील काही अपप्रवृत्तीला बगल देत त्यांनी खाजगी साखर उद्योगाचा आदर्श जगासमोर ठेवला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ठोंबरे यांनी साखर उद्योगाबरोबरच इतर अनेक उपपदार्थ निर्मिती, शाळा, कॉलेज, बँकींग व दवाखाना अशा विविध उपक्रमामध्ये यश मिळविलेले असून त्यांनी यापुढे सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन नाडे यांनी केले.
बी.बी.ठोंबरे म्हणाले, मागील वर्षापासून पावसाने अवकृपा केल्यामुळे कारखना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता अत्यंत कमी झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी मांजरा धरण मात्र अद्याप रिकामेच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही नॅचरल शुगरने जलसंधारणाची कामे केलेल्या गावांमध्ये विहीर, बोअरचे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
या भागातील शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी त्यासाठी कारखान्यामार्फत सवलतीचे दरात ऊस रोपाचा पुरवठा व पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनासाठी विशेष अनुदान ही कारखान्यामार्फत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर शेतक-यांनी नवीन ऊस लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून कांदा व बटाट्याचे उत्पादन घ्यावे यासाठी कारखान्यामार्फत सवलतीचे दरात बियाणांचा पुरवठा केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या साखरेचे भाव अत्यंत खाली आलेले आहेत. अशा बिकट परिस्थितीतही नॅचरल शुगरने मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसास मराठवाड्यातील सर्वाधिक भाव रु. २३०० दिलेला आहे. त्याच बरोबर कर्मचा-यांनाही सर्वाधिक दिवाळी बोनस २० टक्के देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले तसेच हा हंगाम अत्यंत अडचणीचा असला तरीही नॅचरल शुगरचे या हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट ७२५००० मे.टनाचे आहे. या हंगामात कारखाना रॉ शुगर व रिफाइंड शुगरचे उत्पादन घेणार असून ते १०० टक्के निर्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बॉयलरची पुजा कारखान्याचे इलेक्ट्रीकल मॅनेजर किरण पाटील व त्यांच्या पत्नी सौ. किर्ती पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ए.एम.गुजर प्रास्ताविक पांडूरंग आवाड संचालक, आभार दिलीपराव भिसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिवाजीराव लकडे, लालासाहेब पाटील, काळदाते, संचालक, प्रवर्तक, शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.