उस्मानाबाद :- राज्य शासनाने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009 मधील तरतूदीनुसार पहिली ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे व सर्व माध्यमातील अनुदानित, विनाअनुदानित शाळांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याचे अनिवार्य केले असून येत्या 15 डिसेंबर रोजी जिल्ह्यात त्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेतील दोन्ही पेपरसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून 12 हजार, 914 उमेदवार बसणार आहेत.
या परीक्षेच्या पूर्वनियोजनासंदर्भात नुकतीच अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी बैठक घेतली. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजीनाथ खांडके, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर चौधरी, शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) औदुंबर उकीरडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
ही परीक्षा कापीमुक्त वातावरणात पार पाडावी, परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने तेथे सुविधा पुरविण्याचे काम करावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पेपर क्रमाक 1 (इयत्ता पहिली ते पाचवी) साठी एकूण 7 हजार 857 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यात मराठी माध्यमासाठी 7 हजार 556, उर्दू-232, इंग्रजी-48 तर पेपर क्रमांक 2 (इयत्ता सहावी ते आठवी) साठी मराठी माध्यमातील 4 हजार 956, उर्दू-69, इंग्रजी-53उमेदवार परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यात पेपर क्र. 1 साठी 25 तर पेपर क्र. 2 साठी 17 केंदर् असणार आहेत. निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राच्या ठिकाणची वाहतुकीची सोय लक्षात घेऊन चार ते पाच परीक्षा केंद्रनिहाय झोन निश्चित करण्यात आले आहेत. झोननिहाय नियंत्रक पथक स्थापन करण्यात आले आहे. परीक्षेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती यावेळी चौधरी यांनी दिली. जिल्हास्तरावर शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
या परीक्षेच्या पूर्वनियोजनासंदर्भात नुकतीच अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी बैठक घेतली. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजीनाथ खांडके, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर चौधरी, शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) औदुंबर उकीरडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
ही परीक्षा कापीमुक्त वातावरणात पार पाडावी, परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने तेथे सुविधा पुरविण्याचे काम करावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पेपर क्रमाक 1 (इयत्ता पहिली ते पाचवी) साठी एकूण 7 हजार 857 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यात मराठी माध्यमासाठी 7 हजार 556, उर्दू-232, इंग्रजी-48 तर पेपर क्रमांक 2 (इयत्ता सहावी ते आठवी) साठी मराठी माध्यमातील 4 हजार 956, उर्दू-69, इंग्रजी-53उमेदवार परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यात पेपर क्र. 1 साठी 25 तर पेपर क्र. 2 साठी 17 केंदर् असणार आहेत. निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राच्या ठिकाणची वाहतुकीची सोय लक्षात घेऊन चार ते पाच परीक्षा केंद्रनिहाय झोन निश्चित करण्यात आले आहेत. झोननिहाय नियंत्रक पथक स्थापन करण्यात आले आहे. परीक्षेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती यावेळी चौधरी यांनी दिली. जिल्हास्तरावर शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.