उस्मानाबाद :- जिल्ह्यातील वीजग्राहकांच्या अडी अडचणींसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री चव्हाण यांनी महावितरणच्या उस्मानाबाद विभागाच्या अधिका-यांशी आज चर्चा केली आणि नागरिकांना वीज नसल्यामुळे सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांबाबत चर्चा केली. सूचना देऊनही अनेक ठिकाणी महावितरण कार्यवाही करण्यास टाळाटाळ करते. वीजबिल भरुनही संबंधित डीपीवर असणाऱ्या थकबाकीदारांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील नागरिक व ग्रामपंचायतींच्या लेखी तक्रारीसह उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणचे उस्मानाबाद विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. लवटे यांच्यासह इतर अधिकारी, विश्वास शिंदे, लक्ष्मण सरडे, नितीन बागल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  
 
Top