उस्मानाबाद : पळसप (ता.जि. उस्‍मानाबाद) येथे रविवार दि. 2 डिसेंबर रोजी तिसरे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा.इंद्रजित भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.
    स्व. आमदार वसंतराव काळे यांच्या 8 व्या जयंतीनिमित्त शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि किसान वाचनालयाच्या वतीने संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्राचार्य रा. रं. बोराडे, खासदार रजनीताई पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, सतीश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार विक्रम काळे यांनी केले आहे.
 
Top