सोलापूर -  सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत शांतता, सुरक्षितता अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्था राखता यावी म्हणून जिल्ह्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे 37 (1)(अ ते फ) कलमान्वये पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्द वगळून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 08.00 वाजले पासून ते दि. 1 जानेवारी 2015 रोजीच्या रात्री 20.00 वाजेपर्यंत आदेश जारी केला आहे.
    या कलमान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, सुरे, काठी किंवा झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे, आणणे, दगड अगर तत्सम वस्तु, शस्त्रे हाताळणे अगर त्याचा फेकून मारण्यासाठी उपयोग करणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती किंवा त्याची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे या बाबीस प्रतिबंध जाहिर केला आहे. असभ्‍य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नितीविरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील  त्यामूळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल अशी सोंगे, चिन्हे तयार करुन त्याचा प्रसार करणे यास या कलमान्वये प्रतिबंध घालण्यात आला आहे. ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये बजावताना वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक, दुय्यम पोलीस निरिक्षक यांनी दिलेल्या पूर्व परवानगीस लागू होणार नाही.                    
 
Top