पांगरी (गणेश गोडसे) घारी ता.बार्शी येथील कवी आबासाहेब घावटे लिखित पाऊस धारा या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या गुरुवारी दि.25 रोजी दुपारी 3.30 वाजता मातृ मंदिर (ढगे मळा)येथे ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे (उस्मानाबाद)यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक व नाट्य निर्माते अशोक घावटे (पुणे)यांनी एका प्रशिद्धी पत्रकाद्वारे दिली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी कवि कालिदास मंडळाचे अध्यक्ष डॉ.कृष्णा मस्तूद (बार्शी) हे असणार आहेत.
  यावेळी प्राचार्य दिपक गुंड,जयकुमार शितोळे,परंड्याचे गट शिक्षनाधिकारी श्री.ए.एम.जाधव,संदीप आलाट आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.तरी कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन कृष्णा मस्तूद,रामचंद्र इकारे,चन्नबसवेश्वर ढवन यांनी केले आहे॰
 
Top